Wednesday, October 23, 2013

ध्यान


खरं सांगू का
कविता प्रत्येकानं
लिहिली पाहिजे
कविता म्हणजे
फक्त शब्दांचा
खेळ नसतो
आतून लयीत
येणारा आपलाच
आवाज असतो
ऐकण्या साठी
तुम्हाला शांत
बसावं लागतं
आपल्या आत
डोकवावं लागतं
ध्यान असं मस्तं
लावावं लागतं
ध्यान लागलं
कि जीवन
समृध्द होतं
असं मला खात्रीनं वाटतं
सांगा तुम्हालाही हे पटतं?

-सत्यजित खारकर

No comments:

Post a Comment