खरं सांगू का
कविता प्रत्येकानं
लिहिली पाहिजे
कविता म्हणजे
फक्त शब्दांचा
खेळ नसतो
आतून लयीत
येणारा आपलाच
आवाज असतो
ऐकण्या साठी
तुम्हाला शांत
बसावं लागतं
आपल्या आत
डोकवावं लागतं
ध्यान असं मस्तं
लावावं लागतं
ध्यान लागलं
कि जीवन
समृध्द होतं
असं मला खात्रीनं वाटतं
सांगा तुम्हालाही हे पटतं?
No comments:
Post a Comment