Tuesday, July 16, 2013

दिलासा


दिशा हरवतात माणसे हरवतात 
मित्र हरवतात वाटा हरवतात 
काळाच्या  धुक्यात विरून जातात 
धुक पण हरवतं, जणू काही स्व:तात 
जसा तू  हरवतोस सदा शून्यात    
पण जे हरवतं ते कुठे तरी असतेचना?
त्याचं  अस्तित्व डोळ्यांना दिसत नाही 
मनात मात्र आठवांच्या हट्टी सावल्या  
पोरक्या भिंतीशी दिवसभर कवडसे धरतात 
 -सत्यजित खारकर