योग्य काना, मात्रा, वेलांटी, उकार
नेमका शब्द, योग्य वेळ, गेला बाजार मूड
याला काय वाटेल, तो काय म्हणेल , मला कोण हसेल
कवितेचा वि ह्रस्व की दीर्घ ?
या सगळ्या वैचारिक गोंधळात वर्षा मागून वर्ष गेली
मनातला गाणं त्यांच्या मनातच राहिलं
हळू हळू हिरवं गार पान पार सुकून गेलं
आताशा ते फक्त बोचरी टीका करतात
मात्र कविता वाचनाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून जातात ..
-सत्यजित खारकर
No comments:
Post a Comment